January 26, 2025 8:29 PM

views 50

अरविंद केजरीवाल यांनी जनतेला आयुष्मान भारत योजनेपासून वंचित ठेवलं – गृहमंत्री अमित शाह

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या जनतेला आयुष्मान भारत योजनेपासून वंचित ठेवल्याची टीका भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. नवी दिल्लीत नरेला इथं ते प्रचारसभेला संबोधित करत होते. केजरीवाल यांच्या राजवटीत दिल्लीतल्या पायाभूत सुविधांचा ऱ्हास झाला, दिल्ली गेल्या दहा वर्षांत पाणीपुरवठा आणि कचऱ्याच्या समस्येशी झुंजत आहे, असं शहा म्हणाले. भाजपाची सत्ता आल्यावर प्रत्येक नागरिकाला १० लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळतील असं आश्वासन शहा यांनी दिलं.    महाराष्ट्रात लाडकी बहीण योजने अंतर्गत म...