July 4, 2025 9:09 AM

views 39

राज्याच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ

राज्याच्या विविध भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काल गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरेखोल, कर्लीसह काही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कर्ली नदी इशारा पातळीच्या वरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातली जगबुडी आणि राजापूर तालुक्यातली कोदवली या दोन नद्यांनीही इशारा पातळी ओलांडली ...

June 20, 2025 4:46 PM

views 48

राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी नद्याचं वाढलेलं पाणी प्रवाहात येत असल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पुण्याजवळ खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण ८४ टक्के भरल्याने १५ हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात आलं.   नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून एक हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. &n...