July 23, 2025 2:38 PM

views 23

सीमापार दहशतवादाला मदत पुरवणाऱ्या देशांना दंड ठोठावण्याची भारताची मागणी

सीमापार दहशतवादाला मदत पुरवणाऱ्या देशांना दंड टोठावण्याची मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केली आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरिश यांनी सुरक्षापरिषदेतर्फे आयोजित चर्चेत ही मागणी मांडली. ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची विनंती  पाकिस्तानच्या लष्कर परिचालन विभागप्रमुखांनी केल्यानंतर ते थांबवण्यात आलं त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यस्थी केल्याचा दावा हरिश यांनी फेटाळून लावला.