October 21, 2024 4:15 PM

views 68

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे शेतपीकांचं नुकसान

नाशिकमध्ये विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ३८ हजार हेक्टरवरची शेतातली पिकं जमीनदोस्त झाली आहेत. या पावसामुळे ७६ हजार ५८८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चांदवड, देवळा, कळवण, त्रंबक आणि बागलाणमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मका, कांदा भातपिकांचं तसंच द्राक्ष पिकांचं नुकसान झालं आहे.