February 19, 2025 1:42 PM

views 38

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं निधन

मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. गेल्या रविवारी रेगे यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं होतं.     मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती. प्रथम श्रेणीतले ५२ सामने खेळणाऱ्या रेगे यांनी १२६ गडी  बाद केले होते. १९७० मध्ये  मिलिंद रेगे यांनी मुंबई रणजी संघाचं कर्णधारपद भूषविलं होते. निवृत्तीनंतर रेगे यांनी मुंबई क्रिकेट संघटना- MCA चे  निवड समितीत सद...

February 18, 2025 3:37 PM

views 55

रणजी करंडक : मुंबई विरुद्धच्या उपान्त्य सामन्यात विदर्भाचा पहिल्या डावात ३८३ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूरमधे सुरू असलेल्या उपान्त्य सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात मुंबईसमोर ३८३ धावांचा डोंगर उभारला आहे. काल नाणेफेक जिंकून विदर्भाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसअखेर त्यांच्या ५ बाद ३०८ धावा झाल्या होत्या. मुंबईचा डाव सुरु झाला असून चहापानापर्यंत  त्यांच्या २ गडी बाद ८५ धावा झाल्या होत्या.     अहमदाबाद मधे दुसरा उपांत्य सामना केरळ आणि गुजरात दरम्यान सुरू असून, केरळनं काल पहिल्या दिवसअखेर ४ बाद २०६ धावा केल्या. आज दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त मिळालं ...

February 15, 2025 1:15 PM

views 44

महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

महिला प्रीमिअर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता वडोदरा इथं हा सामना सुरू होईल.दरम्यान काल झालेल्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं गुजरात जायंट्सचा ६ खेळाडू आणि ९ चेंडू राखून पराभव केला.   विजयासाठी गुजरातनं दिलेलं २०२ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं केवळ ४ खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं.या सामन्यात गुजरातच्या वतीनं ॲश्ले गार्डनर हीनं सर्वाधिक ७९, तर बंगळुरुच्...

February 14, 2025 2:41 PM

views 627

आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेतील बक्षिसाच्या रकमेत ५३% वाढ

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बक्षिसाच्या रकमेत ५३ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे या करंडक विजेत्या संघाला २० लाख २४ हजार अमेरिकन डॉलर्सची रोख बक्षिसं दिली जाणार आहेत.   तर उपविजेत्या संघाला १० लाख १२ हजार अमेरिकन डॉलर्स किमतीची बक्षिसं दिली जातील. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत.

February 13, 2025 1:26 PM

views 47

इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारताने ३-० नं जिंकली

इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारताने ३-० अशी जिंकली आहे. अहमदाबाद इथं काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने  इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव करून मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताच्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३५ व्या षटकांत २१४ धावांवर आटोपला.  इंग्लंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. टॉम बँटन यानं केलेल्या ३८ धावा ही त्यांच्या खेळाडूंची सर्वोच्च धावसंख्या होती. भारताच्या अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, हार्दिंक पंड्या आणि  हर्ष...

February 12, 2025 9:53 AM

views 68

भारत आणि इंग्लंड यांच्यातला अंतिम सामना आज होणार

भारत आणि इंग्लंड दरम्यान मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात विजयासह मालिका जिंकण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य असेल.

February 10, 2025 1:54 PM

views 49

भारत आणि इंग्लंड क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

  भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना काल भारताने ४ गडी राखून जिंकला. यासह भारताने मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडचं ३०५ धावांचं आव्हान भारतानं ४४ षटकं आणि ३ चेंडूत पार केलं.   कर्णधार रोहित शर्मानं शतकी खेळी करत भारतीय संघाचा विजय सोपा केला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल ६० धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यरनं ४४ आणि अक्सर पटेलनं नाबाद ४१ धावा केल्या.   त्याआधी इंग्लंडचा डाव सामन्यात...

February 9, 2025 7:12 PM

views 23

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर ३०५ धावांचं आव्हान

कटक इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतापुढं विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    इंग्लंडनं  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सामन्यातला शेवटचा चेंडू बाकी असताना त्यांचा डाव संपला. मात्र त्यांनी ३०४ धावा केल्या. फिल्सोल्ट आणि बेेन डकेट यांनी पहिल्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली.    ज्यो रुटनं ६९, तर बेेन डकेटनं ६५, धावा केल्या. लियाम लिविंगस्टोननं ४१, तर हॅरी ग्रोथनं ३१ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे रविंद्र जडेजानं ३ गडी बाद...

February 9, 2025 1:32 PM

views 63

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

भारत आणि इंग्लंड  यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कटक मधे बाराबती इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारत १-० नं आघाडीवर आहे.

February 7, 2025 8:55 AM

views 42

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय

नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने दिलेलं २४९ धावांचं लक्ष्य, भारताने ३९ व्या षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं. शुभमन गील ने ८७, श्रेयस अय्यरने ५९ धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना परवा नऊ तारखेला ओडिशात कटक इथं होणार आहे.