February 2, 2025 8:09 PM

views 64

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरु / अभिषेक शर्मानं झळकावलं ३७ चेंडूत शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे सेटेडिअमवर होत आहे. इंगलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅम्सन फटकेबाजी करताना १६ धावांवर बाद झाला. मात्र अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत शतक ठोकलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १२ षटकात ३ बाद १६१ धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारतानं ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.

November 15, 2024 11:35 AM

views 54

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज संध्याकाळी जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावार खेळला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ नं आघाडीवर आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता हा सामना सुरू होईल.  

October 19, 2024 3:45 PM

views 68

बंगलोर क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांना सूर गवसला

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत अखेर भारतीय फलंदाजांना सूर गवसला.  काल तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा, विराट कोहली आणि सर्फराझ खान यांनी अर्धशतकं झळकावली आणि दिवसअखेर ३ बाद २३१ धावांचा पल्ला गाठला. आज सकाळी खेळ सुरु झाल्यावर सर्फराज खाननं  आंतरराष्ट्रीय कसोटीतलं पहिलं शतक झळकावलं तर ऋषभ पंत यानं ५५ चेंडूत ५० धावा फटकावल्या. भारताची धावसंख्या ३ बाद ३४४ असताना पाऊस पडू लागला आणि उपाहारासाठी  खेळ थांबवण्यात आला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव...

October 8, 2024 11:04 AM

views 45

भारत आणि बांग्लादेशदरम्यान मर्यादित 20 षटकांचा दुसरा क्रिकेट सामना उद्या खेळला जाणार

भारत आणि बांग्लादेशदरम्यान मर्यादित 20 षटकांचा दुसरा क्रिकेट सामना उद्या नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे.  

August 3, 2024 2:42 PM

views 54

भारत आणि श्रीलंकेतला 50 षटकांचा पहिला क्रिकेट सामना ठरला बरोबरीचा

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला झालेला पहिला सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं जोरावर निर्धारीत ५० षटकांमध्ये ८ बाद २३० धावा केल्या. श्रीलंकेच्या वतीनं पथुम निसंका आणि दुनिथ यांनी अर्धशतकी खेळी केली. तर भारताच्या अर्शदीप आणि अक्सर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.   विजयासाठी २३१ धावांचा पाठलाग करताना भारतानं ७५ धावांची दमदार सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताचा संपूर्ण संघ ४८व्या षटकात २३० धावांमध्येच माघारी परतला. ...