December 15, 2025 8:05 PM

views 56

प्रधानमंत्र्यांविषयी काँग्रेस रॅलीत अपशब्द वापरल्याप्रकरणी संसदेत गोंधळ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करुन काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी करत, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेत गदारोळ केला. घोषणाबाजी सतत चालू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसातून दोनदा तर राज्यसभेचं कामकाज एकदा तहकूब झालं.    दिल्लीच्या रामलीला मैदानावर काल झालेल्या काँग्रेसच्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्या...

December 15, 2025 7:14 PM

views 50

निवडणूक आयोगावर काँग्रेसची टीका

निवडणूक याद्या, दुबार मतदार आणि प्रभाग रचनेविषयी विरोधी पक्षांनी हरकती नोंदवल्या होत्या, मात्र निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातला सत्ताधारी पक्षाचा एक कार्यकर्ता प्रभाग रचना करत असल्याचं उघड होऊनही आयोगानं कारवाई केली नाही, असं सांगत महानगरपालिका निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

November 29, 2025 6:06 PM

views 55

मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी – वर्षा गायकवाड

मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली  आहे. त्या मुंबईत हवेच्या गुणवत्ता विषयावर काँग्रेसकडून आयोजित बैठकीत आज बोलत होत्या. दूषित हवेमुळे दरवर्षी मुंबईतले ५ हजार शंभर लोक आपले प्राण गमावतात असं गायकवाड यांनी हावर्ड विद्यापीठाच्या अभ्यासाचा हवाला देऊन सांगितलं.  बेसुमार बांधकाम, वृक्षतोड, पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन यामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. मात्र महायुती सरकार केवळ कंत्राटदारांच्या फायद्याची ध...

November 15, 2025 7:05 PM

views 56

निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक-रमेश चेन्निथला

निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक असून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि ताकदीनं उभा राहील असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. मुंबईत आज काँग्रेसचं एकदिवसीय शिबीर झालं त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेस ही एक विचारधारा आहे, काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे काँग्रेस कधीच संपत नाही असं चेन्निथला म्हणाले. निवडणुकीत हार-जीत होतच असते, पण सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही. नकारात्मकता सोडून लढाऊ बाणा अंगी बाळगा, असं आवा...

November 10, 2025 3:00 PM

views 268

मोठी बातमी! मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवायचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी तिथली राजकीय परिस्थिती बघून घेतला असून तसे सर्व अधिकार त्यांना दिलेले आहेत, असं त्यांनी सांगितलं.   महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांच्या व्यतिरिक्त, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोडून इतर कोणत्या पक्षांसोबत आघाडी करावी, य...

November 8, 2025 7:03 PM

views 52

राज्यातल्या जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढून हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात असून या सर्व जमीन व्यवहाराची श्वेतपत्रिका काढावी आणि हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा करावी अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मुंबईत टिळक भवन इथं ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुण्यात कोरेगाव पार्क इथल्या जमीन व्यवहारावरून त्यांनी सरकारवर टीका केली. हा गैरव्यवहार उघड झाल्यावर तो रद्द करण्यात आला, मात्र दोषींवर काहीही कारवाई केली नाही अशी टीका सपकाळ यांनी केली. 

November 5, 2025 4:02 PM

views 44

भाजपा नेते किरेन रिजीजू यांची राहुल गांधीवर टीका

बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी हरियाणातला बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते किरेन रिजीजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याबद्दल राहुल गांधी भाजपाला दोष देत आहेत. मात्र काँग्रेस अंतर्गत विसंवादामुळे त्यांचा पराभव झाल्याचं त्यांच्याच नेत्या कुमारी शैलजा यांनी सांगितलं होतं, असं रिजीजू म्हणाले. निवडणुकीत भाजपाने हस्तक्षेप केल्याचा आरोप फेटाळून लावत गांधी विदेशात जाऊन ...

October 22, 2025 7:24 PM

views 92

कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचा काँग्रेसचा आरोप

केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. एकीकडे राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांना पाच कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे असं म्हणत, सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. राज्यातल्या आदिवासी आणि मागासवर्गीय विभागांचा निधी वळवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.    मनसेच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाबद्दल...

October 12, 2025 6:15 PM

views 92

माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज – काँग्रेस

माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस सरकारनं आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला आज २० वर्ष पूर्ण झाली, मात्र जनतेला दिलेल्या या महत्वाच्या अधिकाराची धार भाजपा सरकार बोथट करत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा कायदा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

October 7, 2025 7:28 PM

views 64

सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत तसंच  कर्जमाफी करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली.    अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने केवळ ६ हजार ५०० कोटी रुपये इतकीच मदत दिली असून बाकीचे पैसे वेगवेगळ्या योजनांचा भाग आहेत, त्यांचा समावेश पॅकेजमधे करून सरकारने चलाखी केल्याची टीका किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे.