July 31, 2026 5:27 PM

views 69

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची १७ पदकांची कमाई

ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या ११० किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं, तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत ११० पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारतला तीन सुवर्ण, १० रौप्य आणि चार कांस्य अशी १७ पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.