December 15, 2024 9:26 AM

views 71

सृजनशील समाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं काळाची गरज – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केलं. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना, अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं आयोजन केले पाहिजे, याकरीता शासन आपल्या पाठीशी नेहमी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमं...

December 14, 2024 10:13 AM

views 52

भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

भविष्यात मुंबई फिन-टेकची राजधानी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधे वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. २०२८ ते २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट राज्य सरकार पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला भारताचे पॉवर हाऊस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले.‘‘हमारे देश में केवल आर्थिक और सामाजिक ने तो सांस्कृतिक पुन...

December 13, 2024 7:53 PM

views 58

महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र २०२८ ते २०३० पर्यंत पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा प्रारंभ करताना बोलत होते. गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्ध्या ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट पार केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.    महाराष्ट्राला देशातलं सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र भविष्यात मुंबई फिनटेकच...

December 12, 2024 7:16 PM

views 52

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी फडनवीस यांनी प्रधानमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती भेट म्हणून दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य असल्याचं सांगत, राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं असल्याचं फडनवीस यावेळी म्हणाले.   या दोन दिवसीय दौऱ्या दरम्यान ...