September 24, 2025 1:28 PM

views 25

कृषी क्षेत्राने इंधन आणि उर्जानिर्मितीकडे वळणं देशासाठी गरजेचं – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कृषी क्षेत्राने इंधन आणि उर्जानिर्मितीकडे वळणं देशासाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. भारत जैव ऊर्जा आणि तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनाच्या दुसऱ्या भागाचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं. त्यावेळी ते बोलत होते. देशातली ४५ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि त्यांचा जीडीपीतला वाटा १४ टक्के आहे. शेतमालाला वाजवी दर मिळत नसल्याने ग्रामीण भागात गरीबी आणि बेरोजगारीची समस्या असल्याचं ते म्हणाले. शेतीतून उर्जानिर्मितीच्या प्रयत्नांना चालना दिल्यास ग्...