August 2, 2024 11:17 AM

views 41

बिहारमध्ये वीज पडल्यामुळे किमान १० जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये, वीज पडल्यामुळे किमान १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक मृत्यू गया येथे झाले असून, जेहानाबादमध्ये तीन आणि रोहतास जिल्ह्यात दोन मृत्यू झाले आहेत. चालू खरीप हंगामात शेतात काम करणाऱ्या लोकांवर वीज पडल्याने बहुतांश मृत्यू झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घटनामध्ये झालेल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला आहे.  

July 6, 2024 11:34 AM

views 44

बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज पडून 19 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या 24 तासांत वीज पडून 19 जणांचा मृत्यू झाला असून, 7 जण जखमी झाले आहेत. पाऊस सुरू असताना शेतात काम करणाऱ्या आणि झाडाखाली थांबलेल्या लोकांवर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला.   राज्याच्या उत्तर, आग्नेय आणि दक्षिण मध्यवर्ती भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढील 24 तासांसाठी पिवळा बावटा जारी केला आहे.

June 20, 2024 6:53 PM

views 34

बिहारमधलं वाढीव आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

बिहार सरकारनं मागास, अति मागास, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधे लागू केलेलं वाढीव आरक्षण पाटणा उच्च न्यायालयानं आज रद्दबातल ठरवलं. सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत बदल करून बिहार सरकारनं हे आरक्षण ६५ टक्क्यापर्यंत वाढवलं होतं. हे आरक्षण लागू करणाऱ्या बिहार आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवरचा निकाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीं के विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती हरिश कुमार यांच्या ख...

June 19, 2024 8:49 PM

views 46

देशाला २०४७पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आणि परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी नालंदा विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले.   शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक भागिदारी यामुळं तयार होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. जागतिक ...