April 24, 2025 8:26 PM

views 50

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अटारी वाघा बॉर्डरवरचे दरवाजे बंद

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अटारी वाघा बॉर्डरवरचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. दररोजचा रिट्रीट समारंभ, तसंच संध्याकाळी राष्ट्रध्वज उतरवल्यानंतरचं पारंपिरक हस्तांदोलनही आज झालं नाही. हा सोहळा पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे पर्यटक जमले होते, त्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.