April 10, 2025 1:49 PM

views 34

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला कास्यपदक

 तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा  २०२५ च्या पहिल्या टप्प्यात पुरुषांच्या संयुक्त सांघिक क्रीडाप्रकारात भारतानं कांस्य पदक पटकावलं आणि  भारताच्या खात्यात पहिलं पदक जमा झालं.   अभिषेक वर्मा, ऋषभ यादव आणि ओजस देवताळे यांच्या संघानं काल अमेरिकेतल्या ऑबर्नडेल इथं झालेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात डेन्मार्कचा २३०-२२३ असा पराभव केला.   भारतीय त्रिकुटानं उपांत्यपूर्व फेरीमध्ये ग्वाटेमालाचा २२०-२१८ असा पराभव केला होता, परंतु उपांत्य फेरीत इटलीकडून त्यांना थोड्या फरकानं पराभव पत्करावा लागला.