August 9, 2024 3:32 PM

views 43

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज मालदीवच्या ३ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधले परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. हिंद महासागर क्षेत्रात महत्वपूर्ण सामरिक भौगोलिक स्थान असलेला मालदीव हा भारताचा प्रमुख शेजारी देश आहे.