October 23, 2025 2:35 PM

views 88

Cricket 2nd ODI: भारताचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकतेल्या, ॲडलेड इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.   या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सातव्या षटकातच कर्णधार आणि सलामीवर शुभमन गील ९ धावांवर, तर विराट कोहली शुन्यावर बाद झाला. त्यानंतर माजी कर्णधार रोहीत शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी ११८ धावांची भागिदारी करत भारताचा...