July 23, 2024 8:48 PM

views 46

जल जीवन मोहिमेअंतर्गत १५ कोटी कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी

जल जीवन मोहिमेनं देशभरातल्या ग्रामीण भागातल्या १५ कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडण्या देऊन ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जल जीवन मोहिमेच्या माध्यमातून लोकांना शुद्ध पाणी मिळालं असून त्यांत जीवनमान सुधारलं असल्याचं जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.२०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं २०१९ मध्ये जल जीवन मोहिमेची घोषणा करण्यात आली.