June 21, 2024 7:19 PM

views 54

जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाजमाध्यमावर दिली. नागपूर-गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात ते बोलत होते.  हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसंच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल, असं ते म्हणाले. समृध्दी महामार्ग हा प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचीही फेरआखणी करता येईल का, याच...

June 18, 2024 3:54 PM

views 67

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रास्तवित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मार्गासाठी संपादित करण्यात आलेली बहुतांश जमीन बागायती असून या महामार्गामुळे परिसरातल्या पर्यावरण आणि जैवविविधतेचा ऱ्हास होईल या कारणामुळे कोल्हापूरसह १२ जिल्ह्यातले शेतकरी याला विरोध करत आहेत.