August 10, 2024 2:30 PM

views 42

रशियन सैन्यात भरती झालेल्या 91 भारतीय नागरिकांपैकी आठ जणांचा मृत्यू

रशियन सैन्यात भरती झालेल्या 91 भारतीय नागरिकांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून चौदा जणांना सोडण्यात आलं आहे, तर 69 भारतीय नागरिक रशियन सैन्यातून सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती काल परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी लोकसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. या प्रकरणी सीबीआयनं 19 व्यक्ती आणि संस्थांवर फौजदारी गुन्हा दाखल केला असून, 10 मानवी तस्करांविरुद्ध पुरेसे पुरावे मिळाले आहेत. तपासादरम्यान एप्रिलमध्ये दोघा आरोपींना तर मे महिन्यात आणखी...