February 7, 2025 3:54 PM

views 48

रत्नागिरीत क्षेत्रीय वैदिक संमेलनाचं आयोजन

आधुनिक काळातल्या ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन आणि पठणातून काही उपाययोजना करता येते का, यावर संशोधन व्हायला हवं, असं मत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज रत्नागिरीत व्यक्त केलं. तीन दिवसांच्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या संमेलनाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून सुमारे १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.  

February 6, 2025 3:46 PM

views 43

रत्नागिरीत उद्यापासून क्षेत्रीय वैदिक संमेलनाचं आयोजन

रत्नागिरीत उद्यापासून क्षेत्रीय वैदिक संमेलन होणार असून, त्यात चारही वेदांचं पठण केलं जाणार आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतल्या भारतरत्न डॉ. पांडुरंग काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने हे संमेलन आयोजित केलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात १०० वैदिक मान्यवर सहभागी होणार असून, पाच ठिकाणी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधल्या विशिष्ट शाखांचं सामूहिक पारायण तीन दिवसांत केलं जाणार आहे.  

January 16, 2025 9:27 AM

views 72

सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत रत्नागिरीत आढळले ३४ रुग्ण

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत 34 क्षयरुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे यांनी दिली आहे. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.  

November 13, 2024 9:02 AM

views 42

रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांना पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी शाखेने घेतलं ताब्यात

रत्नागिरी जिल्ह्यात नाखरे गावांत बेकायदा वास्तव्यास असलेल्या १३ बांग्लादेशी नागरिकांना काल रत्नागिरी पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी शाखेनं ताब्यात घेतलं. त्यांच्यावर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

November 12, 2024 2:45 PM

views 44

विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदान सुरू

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदान सुरू आहे. पोलीस, तसंच मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रत्नागिरी शहरातल्या दामले हायस्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर उपस्थित राहू न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत काल मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात काल एकंदर ११४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबई शहर जिल्ह्यातल्या १...

September 24, 2024 7:24 PM

views 67

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसानं जोरदार हजेरी लावली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात संगमेश्वरमध्ये सर्वाधिक ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी आज संध्याकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. भुईबावडा घाटात काल दरड कोसळली होती. आज संध्याकाळ पर्यंत दरड हटवून मार्ग मोकळा केला आहे. मात्र अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे. परभणी जिल्ह्यात ही विजेच्या कडकडाटासह मुसळधार प...

August 27, 2024 8:34 PM

views 48

रत्नागिरीत परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपासाकरता SIT ची स्थापना

रत्नागिरी इथं एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून त्यात तांत्रिक/वैज्ञानिक अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर शोधून काढण्याचे निर्देश दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

August 1, 2024 9:30 AM

views 39

रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळेचं आयोजन

रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे काल रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठीची राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतून गावागावात एकत्रितपणे कारखाने उभारता येतील का, या दृष्टीनं विचार करून सर्वांनी प्रयत्न करावे, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी या कार्यश...

July 3, 2024 8:28 PM

views 51

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी थोड्या वेळापूर्वी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरीत शासकीय विधी महाविद्यालय उभारायलाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचं सामंत यांनी सांगितलं. सागरी विद्यापीठाच्या उभारणीसाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचा शासन आदेश निघाल्यानंतर त्यासाठी जिल्हाधिकारी ३० दिवसांत रत्नागिरी तालुक्यात ५० एकर जागा उपलब्ध ...