September 24, 2024 7:24 PM

views 66

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसानं जोरदार हजेरी लावली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात संगमेश्वरमध्ये सर्वाधिक ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी आज संध्याकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. भुईबावडा घाटात काल दरड कोसळली होती. आज संध्याकाळ पर्यंत दरड हटवून मार्ग मोकळा केला आहे. मात्र अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे. परभणी जिल्ह्यात ही विजेच्या कडकडाटासह मुसळधार प...