November 9, 2024 6:49 PM

views 43

महाराष्ट्रातल्या मतदारांनी देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली – प्रधानमंत्री

महाराष्ट्रानं २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षं भाजपाला सातत्यानं संधी दिली, महाराष्ट्रवासीयांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अकोला इथं एका प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे महाराष्ट्राची सेवा करण्यात वेगळंच सुख मिळतं, असंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर देशातलं सर्वात मोठं बंदर असून त्यासाठी ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानम...

October 15, 2024 12:15 PM

views 37

नांदेड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला शेतकरी आसूड मोर्चा

नांदेड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सोयाबीनला प्रति क्विंटल साडे आठ हजार रुपये तर कापसाला ११ हजार रुपये दर द्यावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावं, शेतकऱ्यांचं कर्ज शंभर टक्के माफ करावं आदी मागण्या करण्यात आल्या.  

October 9, 2024 9:52 AM

views 66

अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू , दोन गंभीर जखमी

नांदेड शहरासह जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कंधार तालुक्यात मसलगा इथं एका महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. छत्रपती संभाजीनगर परिसरात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मराठवाड्यात लातूर, नांदेड, जालना आणि बीड शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

July 10, 2024 7:20 PM

views 60

नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असलेले बीएसएफ जवान कामेश कदम यांना कर्तव्यावर असताना वीरमरण

नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असलेले बीएसएफ जवान कामेश विठ्ठलराव कदम यांना काल हरयाणा इथं कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. ते ४२ वर्षांचे होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  कदम यांचा पार्थिव देह आज रात्री विशेष विमानाने नांदेड इथं आणला जाईल आणि उद्या सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

July 3, 2024 7:31 PM

views 41

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं आज नीती आयोगाच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत सर्व निकष ऑगस्टअखेर पूर्ण केले जातील, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातही जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर या तीन महिन्यात संपूर्णता अभियान राबवलं जाणार आहे त्याचं उद्घाटन उद्या परंडा येथे होत आहे या अभियानाविषयी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांन...