October 15, 2024 11:16 AM

views 55

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारपिंपळगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. मराठवाड्यामध्ये जे आवश्यक आहे, त्या बाबी करून नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून समुद्रात वाया जाणारं पाणी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना १२ हजार रुपये देणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, हे देशातल...