September 23, 2024 7:01 PM

views 50

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्याचं राज्यपालांचं आवाहन

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ मुंबई विद्यापीठात झाला. त्यावेळी ते बोलत होते.     राज्यपालांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि  व्यवस्थापन, मानवता विद्या शाखा, आंतरविद्या शाखा अशा विविध शाखांमधून १ हजार १३० पदवीधरांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदा...