April 15, 2025 11:14 AM

views 46

न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत, केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकार देशातली न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय न्यायवैद्यक शिखर परिषदेत ते काल बोलत होते. सरकार कालबद्ध रितीनं योग्य न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्नरत असल्याचं शहा म्हणाले.  

April 9, 2025 3:15 PM

views 41

केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत १०० लाख कापूस गासड्यांची केली खरेदी

केंद्र सरकारने चालू हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत १०० लाख कापूस गासड्यांची खरेदी केली असून कापूस उत्पादकांना त्यापोटी ३७ हजार ४५० कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. यात तेलंगणातून सर्वात जास्त ४० लाख गासडी तर महाराष्ट्रातून ३० लाख आणि गुजरातमधून १४ लाख गासडी कापूस खरेदी झाल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. भारतीय कापूस महामंडळानं देशभरात ५०८ खरेदी केंद्र सुरु केली असून पारदर्शी व्यवहारांसाठी डिजिटल सेवा सुविधांचा वापर केला आहे.

November 9, 2024 11:35 AM

views 34

वैद्यकीय उपकरणनिर्मिती उद्योगासाठी केंद्र सरकारची 500 कोटींची योजना

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं वैद्यकीय उपकरण उद्योगाला बळकटी देण्यासाठीच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेचं उद्धघाटन केलं. ही योजना देशाला वैद्यकीय उपकरण उद्योग क्षेत्रात स्वावलंबी बनवेल आणि या क्षेत्रासाठी क्रांतीकारी ठरेल, असा विश्वास नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला. ही नवी योजना 500 कोटी रुपयांची असून, यात वैद्यकीय उपकरण क्लस्टरसाठी सुविधा, क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास, आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी योजना, क्लिनिकल अभ्यास कार्यक्रम आणि वैद्यकीय उपकरणा...

September 25, 2024 9:55 AM

views 46

शालेय मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वं तत्काळ लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश

सर्वोच्च न्यायालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘शाळांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारनं जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुलांची सुरक्षा आणि हक्क यांच्या संरक्षणासाठी स्थापित राष्ट्रीय आयोगाला राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधण्यास आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायमूर्ती बी.व्ही नागरत्ना आणि एन कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठानं शाळांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्...

August 30, 2024 10:04 AM

views 41

केंद्र सरकारनं इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठवली; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

केंद्र सरकारनं 2024-25 च्या गाळप हंगामासाठी उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यावरची बंदी उठवली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आता इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी देण्यासं...

July 23, 2024 8:24 PM

views 53

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यात २५ हजार गावं बारमाही रस्त्यांनी जोडली जाणार

पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार मदत देणार असून यावर्षी भांडवली खर्चासाठी ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकार करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. ही गुंतवणुक देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३ पूर्णांक ४ दशांश टक्के असेल.   प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यात २५ हजार गावं बारमाही रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. पूर नियंत्रणासह बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी विविध सवलतींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. ग्रामीण आणि शहर...

July 6, 2024 7:13 PM

views 39

देशांतर्गत बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याची केंद्र सरकारची ग्वाही

रब्बी हंगामातल्या कांद्याची बाजारातली आवक वाढत असल्यामुळे कांद्याचे दर स्थिर होत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांंद्याचं उत्पादन कमी होऊनही देशातल्या बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे. त्याचबरोबर यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचं अंदाजित उत्पादन १९१ लाख टन असून देशातल्या ग्राहकांची गरज भागवण्यासाठी ते पुरेसं आहे, अशी माहितीही या मंत्रालयानं दिली आहे. यंदा तीन लाख ६१ हजार हेक्टर परिसरात खरिपातल्या कांद्याची लागवड ...

July 4, 2024 5:04 PM

views 70

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज नांदेड इथं सुरुवात

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज महाराष्ट्रातल्या नांदेड इथं सुरुवात होत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, न...

July 1, 2024 6:08 PM

views 46

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा आरोप

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.

June 29, 2024 10:11 AM

views 48

केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेतील तरतुदींमध्ये बदल

केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेतील तरतुदींमध्ये बदल केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा सहा महिन्यांपेक्षा कमी राहिली आहे, त्यांनाही या योजनेतील विथड्रॉअल बेनिफिट म्हणजे रक्कम काढण्याची सुविधा त्यामुळे मिळणार आहे. सेवा पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा कमी काळ असताना या योजनेतून बाहेर पडणाऱ्या सात लाख कर्मचाऱ्यांना या बदलांचा फायदा होणार आहे.