October 10, 2024 12:59 PM

views 42

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसंच महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांचा उद्या ११ ऑक्टोबरला मुंबईत सत्कार केला जाणार आहे.