September 23, 2024 7:50 PM

views 56

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

महाराष्ट्रात ऊसाचा गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. दिवाळी सण, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून ही तारीख ठरवल्याचं त्यांनी सांगितलं.