February 6, 2025 3:58 PM

views 25

नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकलण्याच्या राज्यशासनाच्या योजनेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विरोध

नापास विद्यार्थ्याना पुढच्या इयत्तेत ढकलण्याच्या राज्यशासनाच्या योजनेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोध केला असून, यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थी परिषदेनं जारी केलेल्या निवेदनातून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात टीका नोंदवली आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी सरकारनं शैक्षणिक निकष कमी करण्याऐवजी शैक्षणिक सुधारणांवर भर द्यावा असं यात म्हटलं आहे. दरम्यान, राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्...