December 4, 2024 10:44 AM

views 48

क्वांटम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारताने इस्रायलला भागीदारीसाठी केले आमंत्रित

क्वांटम तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशानं भारतातील उद्योगांशी इस्त्रायलमधील स्टार्टअप्सनी भागीदारी करावी यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. इस्त्रायलचे उद्योग आणि आर्थिक विभागाचे मंत्री नीर बरकत सध्या भारताच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली. बैठकीत, स्टार्टअपमधील सहकार्य, तसंच अंतराळ आणि क्वांटम तंत्रज्ञान, कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांसंदर्भातील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. तसंच सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुध्दी...

December 3, 2024 10:20 AM

views 42

कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यफेरीत

पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत आज भारतीय संघाची मलेशिया बरोबर लढत होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. या आधी रविवारी झालेल्या सामन्यानं भारतानं दक्षिण कोरियाचा 8 विरुद्ध 1 गोलाने पराभूत करून अ गटात अव्वल स्थान मिळवलं होतं. उपान्त्य फेरीतला आणखी एक सामना पाकिस्तान आणि जपानच्या संघांदरम्यान होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या होईल.

November 10, 2024 1:31 PM

views 47

जागतिक बिलियर्डस स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीला विजेतेपद तर सौरभ कोठारीला कांस्यपदक

भारताच्या पंकज अडवाणीनं IBSF विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत 150-अप फॉरमॅटचं विजेतेपद पटकावलं आहे. कतारमधे दोहा इथं झालेल्या अंतिम लढतीत त्यानं इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा ४ विरुद्ध २ अशा गुणफरकाने पराभव केला. आयबीएफएसच्या जागतिक बिलियर्डस् स्पर्धेतलं पंकज अडवाणी याचं हे २८ वं विजेतेपद आहे. या स्पर्धेत भारताच्या सौरव कोठारी यानं कांस्यपदक मिळवलं.  

October 8, 2024 2:56 PM

views 67

भारताचं जहाज बांधणीच्या क्षेत्रात २०३० पर्यंत पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवण्याचं उद्दिष्ट – प्रल्हाद जोशी

भारतानं जहाज बांधणीच्या क्षेत्रात २०३०पर्यंत पहिल्या दहांमध्ये तर २०४७पर्यंत पहिल्या पाचात स्थान मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं केंद्रीय नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जर्मनीतल्या हॅम्बर्ग सस्टेनिबिलिटी परिषदेत ते बोलत होते. अक्षय उर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. २०१४पासून भारताने आपल्या नवीकरणीय उर्जा क्षमतेमध्ये परिवर्तनात्मक वाढ केली असल्याचंही ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत देशाची सौर उर्जा निर्मितीची क्षमता ३३ पटीने वाढली असून शाश्वत...

August 4, 2024 7:26 PM

views 48

दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य

कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं ९ गडी गमावून २४० धावा केल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं ३, तर कुलदीप यादवनं २ बळी घेतले.  शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं ५ षटकात बिनबाद २९ धावा केल्या होत्या.

July 24, 2024 8:20 PM

views 69

जगातल्या एकूण दूध उत्पादनात भारताचा २५ टक्के वाटा – मंत्री राजीव रंजन सिंग

जगात सर्वात जास्त दूध उत्पादन भारतात होत असून जगातल्या एकूण दूध उत्पादनात भारताचा वाटा २५ टक्के असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आज राज्यसभेत दिली. नीट यूजी परीक्षा रद्द करण्याचा आणि राज्यनिहाय प्रवेश परीक्षा पद्धत पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुजुमदार यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं.

July 6, 2024 7:46 PM

views 56

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे-मंत्री नितीन गडकरी

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे. देशाच्या वाहन उद्योगाची उलाढाल ७ लाख कोटींवरून २० लाख कोटींवर पोहचली आहे. येत्या काळात ही उलाढाल ५० लाख कोटींवर पोहचविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपुरात एका कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यात सेमिकंडक्टरचा प्रकल्प यावा यासाठी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

July 6, 2024 8:17 PM

views 57

झिम्बाब्वे विरुद्धच्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव

झिम्बाव्बे विरुद्धच्या टी - ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं शेवटच्या षटकापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या सामन्यात उतरला होता. नाणेफेक जिंकून भारतीय संघानं झिम्बाब्वेला फलंदाजीला पाचारण केलं. झिम्बाब्वेकडून कुठलाही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. निर्धारित २० षटकात झिम्बाब्वेनं ९ बाद ११५ धावा केल...

June 23, 2024 2:55 PM

views 84

20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशवर मात

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ५० धावांनी विजय टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा ५० धावांनी सहज पराभव केला. अँटीग्वा इथल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात १९६ धावांचं मोठं आव्हान बांगलादेशसमोर ठेवलं. हार्दिक पंड्यानं फक्त २७ चेंडूंमध्ये ५० धावा फटकावल्या, तर ऋषभ पंतनं २८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता...

June 18, 2024 3:12 PM

views 95

टी २० विश्वचषक स्पर्धेतले सुपर ८ देश निश्चित

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सुपर ८ संघ निश्चित झाले आहेत. सुपर ८ च्या पहिल्या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान तर दुसऱ्या गटात अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सुपर ८ फेरीतला पहिला सामना उद्या अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत खेळला जाईल. तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात २० मे रोजी सामना होणार आहे. दोन्ही गटातल्या प्रत्येकी दोन सर्वोत्तम संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे.