राष्ट्रीय

July 23, 2024 8:48 AM

views 63

यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल – प्रधानमंत्र्यांचा विश्वास

संसदेत सादर होणारा यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल; 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा पाया या अर्थसंकल्पातून घातला जाईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवा...

July 22, 2024 9:02 PM

views 50

सर्व राजकीय पक्षांनी आपली पक्षीय धोरणं बाजूला ठेवून पुढच्या साडे चार वर्षांसाठी स्वतःला देशासाठी समर्पित करावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

संसदेत उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अमृत काळातला महत्वाचा अर्थसंकल्प असेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते बातमीदारांशी बोलत होते. हा अर्थसंकल्प पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणार असून सरकारच्या विकसित भारत संकल्पनेचा पाया ...

July 22, 2024 8:15 PM

views 42

नेपाळी कॅलेंडर विक्रम संवतनुसार आजपासून श्रावण संक्रातीला प्रारंभ

नेपाळी कॅलेंडर विक्रम संवतनुसार आजपासून श्रावण संक्रातीला प्रारंभ झाला. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यानं काठमांडूच्या पशुपतीनाथ मंदिरात लाखो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नदीत स्नान केलं. त्यानंतर नदीतील पवित्र पाणी कलशातून मंदिरात आणून शिवलिंगावर अभिषे...

July 22, 2024 8:09 PM

views 53

लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यावर उद्या एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज दिवसभरासाठी स्थगित झालं. लोकसभेत उद्या अर्थसंकल्प सादर झाल्यावर  एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होईल.  राज्यसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हे कामकाज सुरळीत चाल...

July 22, 2024 7:15 PM

views 44

२०२४-२५ वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज

२०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडे सहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. जागतिक स्तरावर आर्थिक ...

July 22, 2024 8:22 PM

views 43

कावड यात्रा मार्गावरच्या, खाद्यगृहांच्या मालकांनी दुकानाच्या पाटीवर स्वतःचं नाव लिहिण्याच्या, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

कावड यात्रा मार्गावरच्या, खाद्यगृहांच्या मालकांनी दुकानाच्या पाटीवर स्वतःचं नाव लिहिण्याच्या, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली.  हे निर्देश धार्मिक भेदभाव करणारे असल्याचं सांगत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, आणि इतर संस्था तसंच व्यक्तींन...

July 22, 2024 2:45 PM

views 35

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर

उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं २०२१ साली झालेल्या हिंसाचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र आशीष मिश्रा याला दिल्ली किंवा लखनौ च्या बाहेर जायला मज्जाव करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने याप्रकरणी लवकर सुनावणी घ्य...

July 22, 2024 2:35 PM

views 35

पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत नामांकन दाखल करता येणार

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर पद्म पुरस्कारांसाठी नामांकन आणि शिफारशी नोंदता येतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश आ...

July 22, 2024 1:30 PM

views 35

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत सांगितलं. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत चालू असून याप्रकरणी न्यायलयात सुनावणी सुरु आहे. असं ते म्हणाले. देशभरात ४हजार ७०० केंद्रांवर नीट युजी परीक्षा घ...

July 22, 2024 1:07 PM

views 43

सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरील बंदी केंद्र सरकारने उठवली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सरकारी कर्मचाऱ्यांना असलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी नोव्हेंबर १९६६ मध्ये ही बंदी लागू केली होती. ती मागे घेण्याचा निर्णय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं घेतला आहे.