November 13, 2024 3:41 PM

views 38

बिहारमध्ये १२ हजार कोटींच्या विकासकामांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि लोकार्पण

सरकार जनतेच्या सेवेसाठी समर्पित असून याच उद्देशानं सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेमुळे जनतेच्या सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. बिहारमधल्या दरभंगा शहरात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज १२ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची...

November 13, 2024 1:41 PM

views 60

बुलडोझर कारवाई द्वारे आरोपीला शिक्षा देऊन न्यायालयाची भूमिका बजावण्याचा सरकारला अधिकार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारांकडून केल्या जाणाऱ्या बुलडोझर कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने आज ही टिप्पणी केली. सरकारकडून अशा प्रकारचं मालमत्तेचं पाडकाम थांबवण्यासाठी न्या...

November 13, 2024 1:57 PM

views 40

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला, सर्व पक्षीय नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरु आहे. सर्व पक्षांचे नेते राज्यभरात आजही ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा धुळे, जळगाव आणि परभणी इथं सभा घेणार आहेत. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा मुंबई आणि अहिल्यानगरमध्ये प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री न...

November 13, 2024 12:51 PM

views 42

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत राबवण्यात आले विविध उपक्रम

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत काल सांगली शहरात आणि सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं सायकल आणि दुचाकी फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते.   धुळे जिल्ह्यात शिरपूर न...

November 13, 2024 10:47 AM

views 43

राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली ...

November 13, 2024 10:43 AM

views 35

आचारसंहिता काळात आतापर्यंत ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण पाच हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी पाच हजार २३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा रोकड, मद्यासह इतर अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू असा सुमारे...

November 13, 2024 10:30 AM

views 43

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार आहे.   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्...

November 13, 2024 10:14 AM

views 32

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची आज सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत नवी दिल्लीत होणार बैठक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री राजपुत्र फैसल बिन फरहान अल सौद यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून मैत्रीपूर्ण आर्थिक तसंच सामाजिक सांस्कृतिक संबंध आहेत. भारत हा सौदी अरेबियाचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे...

November 13, 2024 11:15 AM

views 43

सिल्वासा इथल्या झेंडा चौक शाळेचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या तीन दिवसांच्या दादरा, नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज राष्ट्रपतींच्या हस्ते आज सिल्वासा इथल्या झेंडा चौक शाळेचं उद्घाटन होणार आहे. झेंडा चौक शाळेचं संकुल अत्याधुनिक असून तिथं सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्य...

November 13, 2024 9:34 AM

views 21

२०२४ हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता

दर महिन्याच्या जागतिक सरासरी तापमानात मोठी वाढ दिसून येण्याचा कालावधी लांबल्यामुळे २०२४ हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. कॉप २९ परिषदेत जागतिक हवामान संस्थेनं सादर केलेल्या अहवालात हे नमूद केलं असून पॅरीस करारातली उद्दीष्टं धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. या उद्दीष्टानुसार जागतिक ...