डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2 दशांश टक्क्यांच्या खाली – रोजगार मंत्री

केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2 दशांश टक्क्यांपर्यंत खाली आला असून येत्या काही वर्षात हा दर 3 टक्क्यांच्या खाली येईल असा विश्वास श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला आहे. ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.

येत्या 5 वर्षांत 4 कोटीपेक्षा जास्त युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळतील, असं ते म्हणाले. लोकसभेत कालही अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू होती; यावेळी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जात निहाय जनगणनेची मागणी केली.

 

यंदाचा अर्थसंकल्प हा केवळ श्रीमंतांसाठी होता; यात गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काहीच नव्हतं अशी टीका राहुल गांधी यांनी केली. शेतकऱ्यांना हमी भावाची खात्री देणाऱ्या कायद्यावरही यामध्ये भाष्य करण्यात आलेलं नाही, असा आरोप त्यांनी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा