येत्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमागे कोणतंही राजकारण नसून महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी या बंदचं आवाहन केलं आहे, असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुंबई इथं झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शाळेत जर मुली सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली म्हणण्यात अर्थ नाही. आधी बहीण सुरक्षित असेल तर पुढे लाडकी बहीण वगैरे योजना राबवता येतील, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Site Admin | August 22, 2024 1:15 PM | Uddhav Thackeray
महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी बंदचं आवाहन – उद्धव ठाकरे
