डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 26, 2025 8:27 PM | U19WorldCup

printer

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर ८ गडी राखून मात

आयसीसी १९ वर्षांखालच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर ८ गडी राखून विजय मिळवला. 

 

भारतानं नाणेफेक जिंकून बांग्लादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला. बांगलादेशानं निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून ६४ धावा केल्या. भारतातर्फे वैष्णवी शर्मानं ३ बळी मिळवले. विजयासाठी ६५ धावांचं लक्ष्य घेउन फलंदाजीसाठी उतरल्यावर भारतातर्फे गोंगडी त्रिशानं ३१ चेंडूत ४० धावा केल्या. तर, सानिका चाळकेनं ५ चेंडूत नाबाद ११ धावा केल्या. वैष्णवी शर्मा, या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

 

भारतानं उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं असून, सुपर सिक्स फेरीतला भारताचा अंतिम सामना येत्या मंगळवारी स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा