छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल रात्री नक्षल्यांनी दोन गावकऱ्यांची गळा कापून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याआधी २६ जानेवारीलाही याच जिल्ह्यात पोलिसांना खबर दिल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका गावकऱ्याला ठार केलं होत. गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांनी बस्तर भागातल्या ६८ गावकऱ्यांची हत्या केली आहे .