देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोचणाऱ्या बावीस गाड्या दोन तासांपर्यंत उशीराने धावत आहेत, अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनाने दिली आहे. प्रवाशांनी स्थानकावर पोहोचण्याआधी आपापल्या रेल्वेगाडीच्या वेळेत बदल झाला असल्यास जाणून घेऊन मग प्रवासाला सुरुवात करावी, असं आवाहन रेल्वेनं केलं आहे.