डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरू इथं होणार आहे. दुसरा सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात तर तिसरा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईत होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा