डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल – प्रधानमंत्र्यांचा विश्वास

संसदेत सादर होणारा यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणारा असेल; 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा पाया या अर्थसंकल्पातून घातला जाईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. हे अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी आपापल्या पक्षासाठी काम केलं; जनतेने आपला निकालही दिला; आता पुढची पाच वर्ष सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत देशासाठी समर्पित वृत्तीनं काम करावं, असं प्रधानमंत्री म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा