भारतीय राज्यघटना काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून, तिने देशाला मजबूत, एकसंघ करत स्थैर्य दिलं आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही वर्षात देशानं अनेक बाह्य आक्रमणं आणि अंतर्गत कलहाचा सामना केला आहे, तरीही काळानुरुप बदल स्वीकारत घटनेत दुरुस्ती करण्यात आल्यानं तो एकसंघ आणि मजबूत आहे, असंही गवई म्हणाले.
Site Admin | April 15, 2025 10:35 AM | Bhushan Gavai | indian constitution
भारतीय राज्यघटना काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून, तिने देशाला मजबूत, एकसंघ करत स्थैर्य दिलं – भूषण गवई
