केंद्र सरकार देशातली न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय न्यायवैद्यक शिखर परिषदेत ते काल बोलत होते. सरकार कालबद्ध रितीनं योग्य न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्नरत असल्याचं शहा म्हणाले.