डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

टी ट्वेंटी : भारताच्या पुरुष संघाची पाच सामन्यांची मालिका झिम्बाब्वे येथे रंगणार

भारताचा पुरुष क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान हरारे इथं ही मालिका होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतानं आपला १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून शुभमन गिल याचं नेतृत्व करणार आहे. ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू या संघाचा भाग असतील. या दौऱ्यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून जातील, मात्र नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती श्रीलंकेसोबतच्या मालिकेवेळी केली जाईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. तर झिम्बाब्वेनेही आपला १७ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून सिकंदर रझा याचं नेतृत्व करणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा