डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश

हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश आलं आहे. 2020 मध्ये देशाच्या उत्सर्जनात त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत 7.93 टक्क्यांनी घट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवामान बदल कार्यालयाला सादर केलेल्या 2005 ते 2020 पर्यंतच्या आकडेवारीत भारताच्या GDP च्या तुलनेत उत्सर्जनाच्या तीव्रतेत 36 टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून आलं. भारतानं 2030 पर्यंत जीडीपी उत्सर्जन तीव्रता 45 टक्क्यांनी कमी करण्याचं आणि जीवाश्मेतर इंधनांपासून 50 टक्के विद्युत उर्जा क्षमता साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून आपल्या हवामान उद्दिष्टांच्या मार्गावर आहे. उर्जा उत्पादन, शेती आणि उद्योग यांचा उत्सर्जनामध्ये महत्त्वपूर्ण वाटा असल्यानं, भारतानं पर्यावरणीय समस्यांचं निराकरण करताना विकासाचा मार्ग कायम ठेवण्याचा प्रयत्न करत उत्सर्जनातून आर्थिक वाढ दुप्पट करणं सुरू ठेवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा