एसटी महामंडळाला येत्या ५ वर्षात स्वमालकीच्या २५ हजार नव्या बस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत दिली.
दरम्यान, एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काल ठिकठिकाणी आंदोलन केलं. त्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ गरजेची होती असं स्पष्टीकरण सरनाईक यांनी दिलं आहे.