उत्तरप्रदेशात महाकुंभ दरम्यान चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करुन घ्यायला सर्वोच्च न्यायलयाने नकार दिला आहे. या ढिसाळ व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आली होती. हा सारा प्रकार चिंताजनक आहे मात्र याचिकाकर्त्याने या संदर्भात प्रथम अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे दाद मागावी असं न्यायलयाने सांगितलं.
Site Admin | February 3, 2025 5:28 PM | Prayagraj | Supreme Court
महाकुंभ दरम्यान चेंगराचेंगरीप्रकरणी जनहित याचिका दाखल करुन घ्यायला सर्वोच्च न्यायलयाचा नकार
