विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची अक्षर ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका, इतिहास , कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं, असं प्रतिपादन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज केलं.
नागपूरच्या वारंगा इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ-नागपूर, चा तिसरा दीक्षांत समारंभ आज झाला, त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते संबोधित करत होते. या समारंभात, एकूण १५५ पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये ११२ पदवीपूर्व पदव्या, २८ पदव्युत्तर पदव्या आणि १५ पीएच.डी. पदव्या समाविष्ट होत्या.