आधुनिक काळातल्या ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन आणि पठणातून काही उपाययोजना करता येते का, यावर संशोधन व्हायला हवं, असं मत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज रत्नागिरीत व्यक्त केलं. तीन दिवसांच्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या संमेलनाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून सुमारे १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.