रत्नागिरी जिल्ह्यात जयगड इथं झालेल्या वायुगळतीप्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल हाती आल्यावर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. त्यांनी आज रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची भेट घेतली.
Site Admin | December 13, 2024 7:28 PM | Ratnagiri | Uday Samant
रत्नागिरीत वायुगळतीप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना
