रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामान्यात मुंबईनं मेघालयावर एक डाव आणि ४५६ धावांनी विजय मिळवला. मुंबईनं पहिल्या डावात मेघालयाचा संपूर्ण संघ ८६ धावात गारद केल्यानंतर ७ बाद ६७१ धावांवर काल आपला पहिला डाव घोषित केला होता. मेघालयाचा दुसरा डाव आज १२९ धावांवर आटोपला. मुंबईकडून शार्दुल ठाकुरनं दोन्ही डावात मिळून ८ गडी बाद केले. पहिल्या डावात त्यानं ८४ धावांचं योगदानही दिलं होतं. तो या सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
Site Admin | February 1, 2025 7:55 PM | Cricket
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा मेघालयावर एक डाव आणि ४५६ धावांनी विजय
