लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबईतल्या धारावीला आज भेट दिली. धारावी इथं असलेल्या चमार स्टुडिओला भेट देत कारागिरांशी संवाद साधला.
धारावीत उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी सर्वसमावेश उत्पादन साखळीच्या निर्मितीवर भर द्यावा, असा आग्रह राहुल गांधी यांनी केला. चमार स्टुडिओ हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचंही गांधी यांनी सांगितलं.