डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवलं – प्रधानमंत्री

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागात ते काल बोलत होते. जगातली सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी निवडणूक यंत्रणा आणि मतदारांचं अभिनंदन केलं तसंच देशवासीयांचे आभार मानले. जगभरात भारतीय संस्कृती गौरवली जात असल्याचं सांगताना त्याबाबतची अनेक उदाहरणं प्रधानमंत्र्यांनी मन की बात या कार्यक्रमात दिली. दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात जल्लोषात साजरा झाल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी, दरवर्षी योगदिनाचे कार्यक्रम नवनवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचं नमूद केलं. लवकरच सुरु होणार असलेली जगन्नाथ यात्रा, तसंच अमरनाथ यात्रा आणि पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा