डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

वंदे भारत रेल्वेगाड्यांचा वाढता विस्तार, आधुनिकता आणि वेग हे विकसित भारताच्या दिशेनं पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मीरत-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोईल या तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे देशातली महत्त्वाची शहरं आणि ऐतिहासिक शहरं जोडली जातील, मंदिरांचं शहर असा लौकिक असलेलं मदुराई माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या बेंगळुरूशी जोडलं जाईल, असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. वंदे भारत जिथं पोहोचते आहे, तिथं पर्यटकांची संख्या आणि पर्यायानं तिथले उद्योग, रोजगाराच्या संधी वाढत आहेत, अनेक मार्गांवर वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी होत असून या गाडीतही लवकरच स्लीपर कोच सुरू होणार असल्याची माहितीही प्रधानमंत्री मोदी यांनी दिली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा